Sunday 11 September, 2011

वांझोटा



एका ताज्या सत्य घटनेवर आधारित ही कविता आहे

आट पाट नगरात होते राजा आणि राणी
त्यांच्या संसाराची ही ओंगळवाणी कहाणी

नव्याची नवलाई सरुन गेली
संसाराच्या गराड्यात दडून गेली

राजा वेडा कामात व्यग्र
घरची जबाबदारी राणी वर समग्र

दोघही पाहत होती एकच वाट
स्वप्न रंगवायचे जागून सारी रात

म्हणता म्हणता वर्ष लोटलं
शंकेने काळजीचं धुक दाटल

वैद्य केले बुवा केले, केले उपास तापास
पण वरच्याच्या इच्छे पुढे सगळेच होते नापास

राजा राणी बिचारे झाले उदास
ना लागेना भूक ना उतरेना घास

राजाचा होता एक जीवभावाचा सोबती
राजाराणी च्या दुखाची कळली त्याला व्याप्ती

न राहावून त्याने विचित्र सल्ला त्याला दिला
कोणातरी जवळच्या माणसा करवि मूल होऊदे तिला

मुलाच्या हव्यासा पाई राजा सगळं विसरला
राणीला परक्याशी शैया करण्या इतपत पुरता घसरला

तो सोबती त्याला देवदूत भासला
मूल देण्यासाठी हाच सोबती योग्य आहे मनात त्याच्या ठसला

पुन्हा वर्ष लोटून गेलं
पुन्हा संशयान काळजीच धुक दाटून गेलं

देवदुतासमान सोबती त्याला दुष्ट वाटू लागला
माझ्या राणीशी शय्येसाठी का तो असा वागला????

मित्राने त्याला खूप समजावले
मी सुख नाही घेतले फक्त कर्तव्य पूर्ण केले

पण राजा आता पुरता बिथरला
संशय त्याच्या मनात पूर्ण उतरला

अमावस्येची रात्र त्याने अखेर साधली
लाडक्या राणी सोबत सोबत्याची मान त्याने चिरली

दोघांच्या देहा जवळ ढसा ढसा रडला
बहुतेक दूर वर एक कुत्रा सुधा मनातल्या मनात कुढला

राजाराणी ची कहाणी ऐकून उर फाटून गेला
जाता जाता मनात एक प्रश्न दाटून गेला

समाजात वांझोटा , नपुसन्क ह्या शब्दाना स्थान का??
वंशाला दिवा हवा असा अट्टहास का???

विचार मग्न असताना अचानक भाना वर आलो

" अहो झाली आता दोन वर्ष , पुरे झाल कुटुंब नियोजन,
जग काय म्हणेल???"

बायकोचा आवाज ऐकून वंशाच्या दिव्यासाठी सगळे प्रश्न बाजूला सारून मनोमन तयार झालो.

No comments:

Post a Comment